एक्स्प्लोर

"बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवा, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा"; शिवसेनेची मागणी, भाजप म्हणाला, "बिहार वेगळा, महाराष्ट्र वेगळा"

महाराष्ट्रात बिहार, हरियाणा पॅटर्न राबवण्यात यावा मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर, भाजपनं मात्र, बिहार वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा, असं प्रत्युत्तर शिवसेनेला दिलं आहे.

Maharashtra Politics : राज्यात महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळालं खरं, पण आता मुख्यमंत्री कोण? इथे महायुतीचं घोडं अडल्याचं पाहायला मिळत आहे. आधी शपथविधी 25 तारखेला होणार होता, पण आता सत्ता स्थापनेचा दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनाच (Eknath Shinde) मुख्यमंत्री करा, असा सूर शिवसेनेतून (Shiv Sena) आळवला जात आहे, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी ठराव समंत केल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता शिवसेनेकडून महाराष्ट्रात बिहार पॅटर्न (Bihar Pattern) राबवा आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. 

"महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा"

महाराष्ट्रात बिहार, हरियाणा पॅटर्न राबवण्यात यावा मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे, असं म्हटलं आहे. जसं बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त असतानाही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, अगदी तसंच हरियाणात सैनीसाहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली आणि तेच मुख्यमंत्री झालेत. भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करत नाही, असं मला वाटतं, सर्व योजना आणि शासन आपल्या दारी राबवण्यात शिंदेंची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून शिंदेच मुख्यमंत्री होतील, असं मला वाटतं, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलं जावं, शिवसेना नेत्यांची बॅटिंग 

शिवसेनेमधून मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा सूर आळवला जात आहे. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रि‍पदी कायम राहावं, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे.  त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जावं, यासाठी जोरदार बॅटिंग सुरू आहे. नरेश म्हस्के,संजय शिरसाट,भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जावं, यासाठी महायुतीच्या मित्रपक्षांना साद घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

बिहार वेगळा, महाराष्ट्र वेगळा : रावसाहेब दानवे 

भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, "भाजप आज नाही, अनेक दिवसांपासून मित्र पक्ष असल्यापासून निवडणुका लढवत आहे. ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्यासोबत बसून निर्णय करावे लागतात. एकत्रित निवडणूक लढलो. विधीमंडळ पक्षाची नेते निवड होईल, भाजप देखील लवकर निवड करेल आणि त्यानंतर मित्र पक्षांसोबत बैठक होईल आणि नंतर मुख्यमंत्र्यांची निवड होईल. फडणवीस मुख्यमंत्री होणं हे कार्यकर्त्यांना वाटू शकतं, मला पण वाटतं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, ज्यांच्या सोबत लढलो त्यांना विचारुन सोबत घेऊन निर्णय होईल, बिहार वेगळं आहे आणि महाराष्ट्र वेगळा आहे,  तिथे ठरवलेलं होतं की, कितीही आमदार आलेत तरी नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील. मात्र महाराष्ट्र आम्ही कोणताही चेहरा ठेवलेला नाही, मी अमित भाईंच्या बैठकीत उपस्थित होतो. निवडणुकीनंतर पुढचा निर्णय होईल असं ठरलं होतं, कौल 2019 साली भाजप शिवसेनेला दिला, मात्र उद्धव ठाकरेंनी पर्याय खुले आहे असं बोलले, बाळासाहेबांना शिव्याशाप देणाऱ्यांसोबत जाऊन बसलेत, आम्ही सरकार चालवलं अनेक चांगले निर्णय झालेत, शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय झालेत, लाडकी बहिण योजना आणली, त्यांच्या जाहीरनाम्यात देखील तेच आलं, मी भाजपच्या प्रचाराचा प्रमुख होतो. आम्ही नागपूर संभाजीनगरला बैठक घेतली." 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget