एक्स्प्लोर

Varsha Gaikwad : स्मार्ट सिटी आणि सौंदर्यीकरणाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च, मुंबईला बकाल करण्याचं काम सुरु : वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad : जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा मुंबईत होत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर देखील त्यांनी भाष्य केलं.

मुंबई :महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची प्रचार सभा मुंबईत सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्ष, काँग्रेस पार्टीची महाराष्ट्र स्वाभिमान सभा मुंबईतील बीकेसीमधील मैदानात सुरु आहे. या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी या सभेत बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जगातील सर्वात जमीन घोटाळा मुंबईत होत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन देखील त्यांनी टीका केली. मुंबईला वाचवण्याच्या लढाईमध्ये राहुल गांधींना सहभागी व्हावं लागेल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. 

महाराष्ट्र महिला अत्याचार देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलांवरील, मुलींवरील अत्याचारात महाराष्ट्रात पहिल्या स्थानावर आहे. रेल्वे दुर्घटनेत दररोज सात लोकं मरतात, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाल्याचं देखील आपण पाहिलं आहे. सामान्य माणसांसाठी रेल्वेची सुविधा नाही, प्लॅटफॉर्म नाही. मुंबईची अवस्था काय करुन ठेवली आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. मुंबईला बकाल करण्याचं काम केलं जातंय, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. 

स्मार्ट सिटी आणि सौंदर्यीकरणाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मुंबई महापालिकेची निवडणूक तीन वर्षांपासून होत नाही. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी तोडण्यात आल्या. मुंबईच्या जागा उद्योगपतींना देण्याचं काम चाललंय, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा मुंबईत पाहायला मिळतोय, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतल्या ठिकठिकाणच्या जागा दिल्या जात असल्याचा आरोप देखील वर्षा गायकवाड यांनी केला. मुंबईला वाचवण्याच्या लढाईत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांना सहभागी व्हावं लागेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. 

बदलापूर, नाशिक आणि मुंबईत महिला सुरक्षित नाहीत. 64 हजार महिला बेपत्ता आहेत, याबाबत प्रश्न विचारत आहोत. शक्ती कायदा अडीच वर्ष  धूळखात पडलाय. क्रिकेट घेऊन गेले, बॉलिवूड घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय, असं  वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 दरम्यान, या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सभेला संबोधित केलं. आपण एका लढाईला सामोरं जातोय, एक चीड महाराष्ट्राच्या मनात आहे. ती चीड गद्दारीबद्दल, ती चीड महागाईबद्दल आहे, असं आव्हाड म्हणाले.

इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget