एक्स्प्लोर

लोकसभा निकालाआधी राजकीय हालचालींना वेग, 24 तासात दुसऱ्यांदा चंद्राबाबू नायडू शरद पवार-राहुल गांधींना भेटले

विरोधकांची एकी झाली तर पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचं नावंही पुढं येऊ शकतं. दुसरीकडे लोकसभेत भाजप 200 जागांचा टप्पा गाठू शकलं नाही, तर नितीन गडकरींचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा आज पार पडत आहे. निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होतील. मात्र निकालापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील 24 तासात टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. तसेच काल संध्याकाळी त्यांनी लखनौ येथे बीएसपी अध्यक्ष मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली.

पंतप्रधानपदी मराठी माणूस?

या सगळ्या राजकीय घडमोडींमध्ये महाराष्ट्राली सुखावणारी चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस बसण्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी शरद पवारांची भेट घेतल्यावर या चर्चांना तोंड फुटलं आहे. चंद्राबाबूंनी शरद पवारांच्या भेटीआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली.

त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधकांची मोट बांधण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. जर विरोधकांची एकी झाली तर पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचं नावंही पुढं येऊ शकतं. दुसरीकडे लोकसभेत भाजप 200 जागांचा टप्पा गाठू शकलं नाही, तर नितीन गडकरींचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे. कारण नितीन गडकरींच्या नावावर एनडीएतील घटक पक्षांचं एकमत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र चंद्राबाबूंसोबतच्या बैठकीत पंतप्रधान पदाबाबत काहीही चर्चा झाली नाही. आपापल्या राज्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याबाबत चर्चा झाल्याचं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

लोकसभा निकालाआधी राजकीय हालचालींना वेग, 24 तासात दुसऱ्यांदा चंद्राबाबू नायडू शरद पवार-राहुल गांधींना भेटले

याआधी चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी सीपीआय(एम) महासचिव सीताराम येचुरी आणि आपचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तसेच गेल्या आठवड्यात नायडू यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती.

एनडीएला 200 जागाही जिंकता येणार नाहीत

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 200 जागाही जिंकता येणार नाहीत. विरोधी पक्षाने मनावर घेतलं, तर एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकतात. चंद्राबाबू नायडू यांची तेलगू देसम पार्टी (टीडीपी) याआधी एनडीएचा भाग होती. मात्र निवडणुकीच्या काही महिने आधी नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget