Assembly Elections 2021 : आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या पत्नीच्या गाडीत EVM सापडलं होतं. आता या प्रकरणाचा जिल्हा मॅजिस्ट्रेटकडून तपास करण्याचा आदेश देण्यात आला आहे. करीमगंज जिल्हा उप-अधीक्षक अनबामुथन यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. EVM प्रकरणात या आधीच निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांचे निलंबन केलं आहे. 


या घटनेनंतर आसाममध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. काही ठिकाणी हिंसाही झाल्याचं पहायला मिळालंय. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास जिल्हा मॅजिस्ट्रेट करणार असून तीन दिवसात याचा अहवाल जमा करणार आहेत. या प्रकरणात नेमका कोणाची चूक होती काय किंवा EVM वर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का याचा तपास करण्यात येणार आहे.


या घटनेनंतर निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. जप्त केलेले ईवीएम मशीन सीलबंद होते. तरीही LAC 1 रतबाडी (SC) इंदिरा एम.वी स्कूलमध्ये पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


काय आहे प्रकरण? 
दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता सुरक्षा व्यवस्थेसह ईवीएम मशीनसह अधिकारी मतदानस्थळाहून निघाले होते. पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार आहे.  निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं, असं आयोगाने सांगितलं.


घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टीका केली होती. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशीनची खासगी सापडल्यानंतर अनेक गोष्टी सारख्याच असतात. पहिलं म्हणजे गाडी भाजपा उमेदवारांची वा त्यांच्या सहकाऱ्यांची असते. निवडणूक आयोगाने तक्रारींवर कारवाई करण्याची तसेच सर्व पक्षाकडून ईव्हीएम मशीनची पुर्नतपासणी करणे आवश्यक आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं. 


महत्वाच्या बातम्या :