SSC-HSC Exam: यंदाची बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. मात्र याच परीक्षेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा शुल्क घेण्यात येते. विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेली ही रक्कम पुढे विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा केली जाते. दरम्यान यावर्षी दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षेसाठी  तब्बल एकूण 13 कोटी 48 लाख 83 हजार 950 रुपये शुल्क मंडळाच्या खात्यात जमा झाले आहेत. ज्यात दहावीसाठी 6 कोटी 75 लाख 78 हजार 750 रुपये आणि बारावीच्या परीक्षेसाठी 6 कोटी 73 लाख 5 हजार 200 रुपये परीक्षा फी म्हणून जमा करण्यात आली आहे. 


पुढील महिन्यापासून दहावी-बारावी परीक्षा सुरु होणार आहे. ज्यात औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून बारावीचे 1 लाख 78 हजार 499 विद्यार्थी तर दहावीची परीक्षेसाठी 1 लाख 66 हजार 964 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. मात्र याच परीक्षेसाठी मंडळाकडून परीक्षा फी जमा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच शुल्कातून परीक्षेचे सर्व साहित्य, मंडळाची दैनंदिन खर्च, कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन, पेन्शन खर्चही यातून भागवले जाते. तर यावर्षी विभागीय शिक्षण मंडळास दहावीच्या 1 लाख 80 हजार 210 विद्यार्थ्यांकडून 6 कोटी 75 लाख 78  हजार 750 मिळाले आहे. सोबतच बारावीच्या 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थ्यांकडून 6 कोटी 73 लाख 5 हजार 200 रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर शुक्रवार 27 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉलतिकिट मिळणार आहे.


यावर्षी असणार असे बदल! 


गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र यावेळी परीक्षेत काही बदल करण्यात आले आहे. ज्यात गेल्यावर्षी परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. सोबतच दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. 


परीक्षा देणाऱ्या विध्यार्थी संख्या! 


औरंगाबाद विभागता दहावीसाठी एकूण 1 लाख 80 हजार 210 विध्यार्थी परीक्षा देणार असून, ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 64 हजार 593, बीड 41 हजार 521, परभणी 27 हजार 800, जालना 30 हजार 676 आणि हिंगोली जिल्ह्यातील 15 हजार 620 विद्यार्थ्यांनाचा समावेश आहे. तसेच बारावीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील 60 हजार 400, बीड 38 हजार 929, परभणी 24 हजार 366, जालना 31 हजार 127 आणि हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 441 विद्यार्थ्यांनाचा समावेश आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


तुम्हीच सांगा! बोर्ड परीक्षेतील कॉपी प्रकरणं कशी रोखायची?; शिक्षक, विद्यार्थी, पालकांकडून बोर्डाने मागितला कृती कार्यक्रम


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI