Vasai: वसईत हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करुन फरार झालेला तिच्या प्रियकरानेही बिहार मधील एका हॉटेल मध्ये गळफास घेवून, आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. सागर असं या मृत तरुणाचे नाव आहे.  


काय आहे प्रकरण?


वसई पश्चिमेच्या स्टेट्स या हॅाटेलमध्ये 28 फेब्रुवारीला एका 26 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलगी आपला मित्र सागर नाईक सोबत त्या हॉटेलमध्ये आधल्या दिवसापासून होती. सागर सायंकाळीच निघून गेला. त्यावेळी दुसऱ्या दिवशी रुममधून काहीच हालचाल नसल्याने हॉटेलमालकांनी पोलिसांना बोलावून रुमचा दरवाजा उघडला. त्यानंतर तरुणीची हत्या झाल्याच कळलं. वसई पोलिसांनी सागरवर हत्येचा गुन्हा दाखल करुन, शोध सुरु केला होता. मात्र हत्येनंतर सागर झाला होता. 


बिहारमध्ये केली आत्महत्या


बिहारच्या मुझ्झफरपूर येथील आस्था हॉटेलमध्ये सागरने आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. आस्था हॉटेलमध्ये 5 मार्चला दुपारी 12.30 ला सागर हॉटेलमध्ये आला होता. आणि तो 6 मार्चला हॉटेल सोडणार होता. 6 मार्चला सागर हॉटेलबाहेर न आल्याने शेवटी हॉटेलमालकांने बिहार पोलिसांनी बोलावून, दरवाज्या वरची काच तोडून आत प्रवेश केला. बिहार पोलिसांना सागरचा मृतदेह बाथरुमच्या जवळ सोफ्याखाली डोक असलेल्या अवस्थेत मिळाला. तर सागरने गळ्यावर नायलॉन केबल टाईच्या चार स्ट्रिपने गळा आवळा असल्याच दिसून आलं. नायलॉन केबल टाईचं बडल देखील पोलिसांना सागरच्या बॅगेतून मिळाला आहे. 


दरम्यान, सोमवारी रात्री वसई पोलिसांना कळवल्यानंतर सागरचे कुटुंब सागरचा मृतदेह वसईला आणण्यासाठी आज सकाळी बिहारला गेले आहेत. सागरने मरतेशेवटी काही चिठ्ठी लिहली आहे का? सागरने तरुणीची हत्या का केली? याबाबत काही पुरावे सापडतात का, हे शोधण्यासाठी माणिकपूर पोलीस ही बिहारला रवाना झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या