Hingoli crime:  हिंगोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून पोलिसांकडून त्रास झाल्याने तरुणानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीये. आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या पीएसआय अधिकाऱ्यासह 9 जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


हिंगोली जिल्ह्यातील पानकरेर गाव येथील आकाश देशमुख याचे जालन्यातील पिंपळगावच्या एका मुलीवर प्रेम होतं. तर प्रेमातून दोघांनी पळून जाण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु यासाठी पोलीस अधिकाऱ्यासह नऊ जणांनी तरुणास त्रास दिला होता. याच त्रासाला कंटाळून तरुणाने पानकनेर गावच्या शिवारात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पीसीआय संभाजी खाडे या अधिकाऱ्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.


प्रेमप्रकरणाचा पोलिसांनीच काढला काटा?


सामान्यपणे प्रेमप्रकरणाला विरोध असलेल्या कुटुंबात तरुणाला घरच्यांकडून विरोध होतो. काही घटनांमध्ये तर प्रेमप्रकरणात तरुणाला धमकावण्याचे किंवा हिंसेचेही प्रकार झाल्याचे अनेक वृत्त समोर आल्याचे दिसतात. मात्र, हिंगोलीच्या या प्रेमप्रकरणाचा पोलिसांनीच काटा काढल्याचं समोर येत आहे. प्रेमप्रकरणात पोलिसांच्या दबावासह त्रास वाढल्यानं कंटाळून तरुणानं आत्महत्या केली. शिवारात झाडाला लटकत जीव संपवल्याचे सूत्रांनी सांगितलं असून त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या PSI अधिकाऱ्यासह ९ जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


विवाहित महिलेची तरुणाकडून निर्घृण हत्या


यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत प्रियकराने चक्क विवाहित महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत तिची हत्या केली आहे. ही घटना यवतमाळच्या राळेगाव (Crime Newsपरिसरातील पिंपरी दुर्ग येथील खदानी जवळ घडली आहे. तर ही घटना उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा:


किरकोळ वाद विकोपाला; विवाहित महिलेची तरुणाकडून निर्घृण हत्या, नेमकं प्रकरण काय?