India Gate  Basmati Rice Success Story: भारतीय तांदूळ (Indian Rice) बाजारपेठेत बासमती तांदूळ (Basmati Rice) हा राजा बनला आहे. एकेकाळी हा बासमती तांदूळ पाकिस्तानातून भारतात आला होता. ही कथा आहे इंडिया गेट बासमती तांदळाची (India Gate Basmati Rice ). सुमारे 134 वर्षांपूर्वी पाकिस्तानात सुरू झालेल्या या कंपनीची संस्कृती पेशावरची होती, पण तिचे हृदय दिल्लीत स्थिरावले. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


दिल्लीच्या लाहोरी गेटपासून सुरुवात 


1889 मध्ये खुशी राम आणि बिहारी लाल नावाच्या दोन भावांनी पाकिस्तानातील लायलपूरमध्ये आपला छोटासा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय तेल, गहू, तांदूळ यांच्या विक्रीचा होता. स्वातंत्र्यानंतर दोन्ही भाऊ भारतात येऊन स्थायिक झाले. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी KRBL नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी डाळ, तांदूळ, तेल अशा वस्तू विकायला सुरुवात केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर त्यांच्या बासमती तांदळाला (इंडिया गेट बासमती तांदूळ) मोठी ओळख मिळू लागली. दिल्लीच्या लाहोरी गेटपासून एक छोटी कंपनी सुरू झाली. जी आज इंडिया गेट बासमती राईस नावाचा मोठा ब्रँड बनली आहे.


बासमती तांदूळ हा भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही तर परदेशातही लोकांची पसंती बनला आहे. 1880 मध्ये पहिल्यांदा हा बासमती तांदूळ रुकच्या बाजारात पोहोचला. आज या कंपनीची कमान कुटुंबातील पाचवी पिढी प्रियांका मित्तल यांच्या हातात आहे.


कंपनीने हजारो शेतकऱ्यांना जोडले


इंडिया गेट बासमती तांदूळ देखील सुमारे 95000 शेतकऱ्यांना स्वतःसोबत जोडले. कंपनी थेट शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करते. जेणेकरून शेतकऱ्यांना थेट नफा मिळू शकेल. इंडिया गेट बासमती तांदूळ अनेक प्रकारचे तांदूळ विकतात. ज्यामध्ये बासमती बरोबरच तांदळाच्या इतर जातींचाही समावेश आहे. KRBL कडे तांदळाचे सुमारे 14 ब्रँड आहेत. बासमती तांदळाच्या भारतीय बाजारपेठेत KRBL चा हिस्सा 35 टक्क्यांहून अधिक आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Basmati Rice: बासमती तांदळाबाबत सरकारचा मोठा निर्णय, महागाईपासून मिळणार दिलासा