एक्स्प्लोर

Write-Off Loan Recovery: Write Off केलेली कर्ज वसूली करण्यासाठी सुलभ प्रक्रिया आवश्यक; अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांची कबुली

Write-Off Loan Recovery : एखाद्या कर्जदाराचे कर्ज Write-Of केले म्हणजे कर्ज झाली नाही असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. अशा कर्जांची वसुली प्रक्रिया अधिक सोपी करण्याची गरज असल्यााचे त्यांनी म्हटले.

Write-Off Loan Recovery: एखाद्या मोठ्या कर्जदाराचे कर्ज Write-off  (Loan Write Off Recovery) केल्यानंतर ती वसूल करण्याची प्रक्रिया किचकट असून त्याचे सुलभीकरण आवश्यक असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले. या बहुस्तरीय कर्ज वसुली प्रक्रियेमुळे लहान खातेदारांचे नुकसान होत असून त्यांना न्याय मिळण्यास उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी पीएमसी बँकेतील खातेदारांच्या अनुषंगाने हा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता. निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, कर्ज वसुलीची प्रक्रिया बहुस्तरीय, काहीशी किचकट आहे. कर्जदारांची मालमत्ता जप्त केली तरी ही न्यायलयाच्या माध्यमातून कर्ज वसुली प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे त्यांनी सांगितले. ठेवीदारांना न्याय मिळवून देताना ही प्रक्रिया आणखी सोपी कशी होईल, याकडे लक्ष दिले जाईल असेही त्यांनी म्हटले.

अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले की पीएमसी बँकेच्या प्रकरणापुरतं सांगायचे झाल्यास, ज्या तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या मालमत्ता, संपत्तीचा काही भाग पुन्हा मुक्त करण्याबाबत कोर्टाकडे विचारणा केली तरी कोर्टाकडून तसं करण्यास नकार दिला जाऊ शकतो. सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, हेतू चांगला असू शकतो. मात्र, कर्ज write off केल्याने त्याचा फायदा कोणाला होतो, ही प्रक्रिया सोपी होणार नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. 

सप्टेंबर 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लागू केले होते. पीएमसी बँकेतील खातेदारांना रिझर्व्ह बँकेने सहा महिने फक्त एक हजार रुपये काढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ही मर्यादा 25 हजार रुपये आणि त्यानंतर 40 हजार रुपये करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2020 मध्ये पीएमसी बँकेचे संचालक मंडळ  बरखास्त करत प्रशासकांची नियुक्ती केली होती.  

कर्जाची रक्कम वसूल होणारच

बँकांनी Write Off केलेल्या कर्जाची वसुली केली जाते. कर्ज Write Off होणे म्हणजे कर्ज माफी नाही, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सांगितले. बँकांनी मागील पाच वर्षात 10 लाख 9 हजार 511 कोटी रुपयांचे कर्ज Write Off केले आहे. बँकांकडून सध्या वेगवेगळ्या कर्ज वसुली प्रक्रियेतून कर्ज वसूल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सगळ्या बँका कर्जे राइट ऑफ करतात. राइट ऑफ केलेल्या कर्जांपैकी एक लाख कोटींहून अधिक कर्जाची वसुली झाली असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Petrol Deasil Shortage : 'होर्मुझ'वरील संकट कायम; देशातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल आणि डिझेलवरील निर्यात शुल्क कमी होणार
'होर्मुझ'वरील संकट कायम; देशातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल आणि डिझेलवरील निर्यात शुल्क कमी होणार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र,मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
सरकारी नोकरीची मोठी संधी, ED मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
सरकारी नोकरीची मोठी संधी, ED मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जून महिन्यात तब्बल 13 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जून महिन्यात तब्बल 13 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी 

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
Embed widget