एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : कसा झाला श्री गणेशाचा जन्म? ही कथा खूप रंजक आहे, केवळ वाचून सगळे संकट दूर होतात

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. मात्र त्यांचा जन्म कसा झाला? जाणून घ्या रंजक कथा

Ganesh Chaturthi 2022 : यंदा गणेश चतुर्थीचा सण 31 ऑगस्टला साजरा होणार आहे. या दिवसापासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करून या उत्सवाची सांगता होणार आहे. गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. कारण भगवान गणेशाचा जन्म याच तिथीला झाला होता. त्यांचा जन्म कसा झाला? त्यामागेही एक अतिशय रंजक कथा आहे. ज्याचे नुसते वाचन किंवा श्रवण केल्याने सर्व दुःख दूर होतात.

गणपतीच्या जन्माची रंजक कथा

शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वती देवीचा पुत्र गणेश.. या गणेशजन्माची रंजक कथा अशी की, पार्वती देवीने गणेशाची सुंदर मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला, एके दिवस पार्वती स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना गणेशाला केली. आईचा आदेश मानून गणपती व्दाराजवळच बसून राहिला. तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले. गणपती हा आपलाच पुत्र असून, पार्वती देवीच्या आदेशावरूनच गणेश तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती. महादेवांनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता, गणपतीने त्यांना अडवले. सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावले. मात्र, गणेशाने ते ऐकले नाही. आईची आज्ञा पाळण्याचा संकल्पच त्याने घेतला होता. महादेवांनी गणपतीला समजावले. मात्र, तो हटला नाही. शेवटी पिता-पुत्रामध्ये युद्ध झाले. आणि महादेवांनी त्रिशुळाचा गणपतीवर जोरदार प्रहार केला. या प्रहारामुळे गणपतीचे मूळ शीर धडावेगळे झाले. काही वेळाने पार्वती देवी तेथे आली. गणपतीला निपचित पडलेले पाहून त्या प्रचंड दुःखी झाल्या. अत्यंत क्रोधीत झाल्या. माझ्या पुत्राला पुन्हा जीवंत केले नाही, तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन, असे पार्वतीने महादेवांना सांगितले. त्यानंतर शंकरांनी तातडीने नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले. बऱ्याच वेळानंतर अखेर त्यांना एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक घेऊन ते शंकरांकडे आले. महादेवांनी हत्तीचे मस्तक त्या बालकांच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान दिले. यानंतर सर्व देवांनी गणपतीला प्रथम पूजनीयचे वरदान दिले.

गणेश चतुर्थीच्या करा हे उपाय

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ अवश्य करावा.शास्त्रात गणेश यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारिक साधन म्हणून केले आहे. चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना विशेष फलदायी असते. घरामध्ये या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही.गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. श्री गणेशाच्या मंदिराला भेट द्या आणि त्याला प्रार्थना करा. हत्तीला हिरवा चारा दिल्यास या समस्या लवकर संपतात. पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणेशाला गूळ आणि शुद्ध तूप अर्पण करावे. यानंतर या भोगाचा नैवेद्य गायीला खाऊ घाला. या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वैवाहिक जीवनात अडचणी आल्यास गणेश चतुर्थीचे व्रत ठेवा आणि बाप्पाला मालपुवा अर्पण करा. यामुळे लवकरच विवाह होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणे देखील शुभ आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत

Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
Shiv Puran: कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
Gajkesari Yog 2026: 16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget