एक्स्प्लोर

Chanakya Niti: ही 4 कामं करणारे कुटुंब सदैव सुखी असते, दु:खाची छायाही त्यांच्या जवळ येत नाही, चाणक्य म्हणतात...

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे, ती कोणती कामे, ज्यामुळे कुटुंबावर दु:खाची छायाही फिरकू शकत नाही. जाणून घ्या

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी यशस्वी जीवनासाठी त्यांच्या नीतीशास्त्रात (Chanakya Niti) काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी चाणक्यांनी अशाच काही खास कामांचा उल्लेख केला आहे. काही महत्वाच्या गोष्टी मनुष्याने आचरणात आणल्यास व्यक्ती स्वतः आणि त्याचे कुटुंब नेहमी आनंदी राहतात. यासोबतच समाजाचेही कल्याण होते. जाणून घ्या अशी कोणती कामे आहेत? ज्यामुळे व्यक्तीच्या कुटुंबावर दु:खाची छाया फिरू शकत नाही. (Chanakya Niti In Marathi)


नात्रोदक समं दानं न तिथि द्वादशी समा।

न गायत्र्या: परो मंत्रो न मातुदेवतं परम्।।


गायत्री मंत्र
शास्त्र, सनातन धर्म आणि चाणक्य यांनी गायत्री मंत्राला सर्व मंत्रांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि अधिक प्रभावी मानले आहे. या मंत्रासारखा दुसरा मंत्र जगात नाही, कारण ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्वेद आणि सामवेद या चारही वेदांची उत्पत्ती देवी गायत्रीने केली आहे. असं धर्मशास्त्रात म्हटलंय. या वेदांमध्ये यशस्वी जीवनाचे सूत्र स्पष्ट केले आहे. देवी गायत्रीच्या मंत्रांचा जप केल्याने मनुष्य प्रत्येक संकटातून मुक्त होतो. कठीण काळात गायत्री मंत्राच्या जपाने प्रत्येक समस्या दूर होतात.

 

इतरांची सेवा

चाणक्य म्हणतात की, इतरांची सेवा माणसाला असा आनंद देते जे त्याला पैसा किंवा इतर गोष्टी मिळाल्यावरही कधीच आनंद वाटत नाही. आता उन्हाळा येणार आहे वातावरणातील गारवा हळूहळू कमी होतोय. याच उन्हाळ्यात तहानलेल्या माणसांना, पशू-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने माणसाला परम सुखाची प्राप्ती होते. त्याच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात.

 

द्वादशी तिथी

चाणक्याने आपल्या श्लोकात द्वादशी तिथीला जीवनात खूप महत्त्व दिले आहे. चाणक्य आणि त्यांच्या शास्त्रात म्हटलंय की, द्वादशी तिथी सर्व तिथींमध्ये श्रेष्ठ मानली जाते. भगवान विष्णूची आराधना करून द्वादशी तिथीचे व्रत केल्यास मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.

 

धर्म आणि दान

आचार्य चाणक्यांनुसार, ज्या व्यक्तीमध्ये दान करण्याची भावना असते, त्यांच्या जीवनात येणारे सर्व संकट टळतात आणि कुटुंब नेहमी सुखी राहते. विशेष म्हणजे निःस्वार्थपणे दान करणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम सात पिढ्यांपर्यंत असतो. यासाठी लोकांनी वेळोवेळी अन्न, पैसा आणि कपडे दान केले पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Chanakya Niti :'ही' लोक यशात आणतात अडथळे, वाईट काळातही त्यांच्याकडे कधीच मदत मागू नका

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget