Honey bee : सध्या राज्यातील शेतशिवारात मधमाशांची (Honey bee) संख्या घटली आहे. यामुळं परागीकरण होत नसल्याचे दित आहे. याचा परिणाम म्हणून कांदा (Onion) आणि सूर्यफूलाचे (Sunflower) बिजोत्पादन (Seed production) घटण्याची शक्यता आहे. या समस्येमुळं आता कांदा आणि सूर्यफूलाचे चांगल्या दर्जाचं बियाणं मिळणंही मुश्किल झाल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. 


फुलांमधून परागीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही


शेतशिवारात मधमाशांची संख्या (Honey bee) घटल्यानं कांदा आणि सूर्यफूल बीजोत्पादन करणारे शेतकरी चिंतेत आहेत. मधमाशा अतिशय कमी झाल्यानं परागीकरण होत नसल्यानं कांदा आणि सूर्यफूल बीज उत्पादन घटण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी (Farmers) दिली आहे. मधमाशांची संख्या घटल्यानं फुलांमधून परागीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळं कांदा आणि सुर्यफुलाचं बिजोत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


परागीकरण कमी झाल्यानं तयार झालेल्या बिजाची उगवण क्षमता कमी 


दिवसेंदिवस नेहमी शेतशिवरात दिसणारे मधमाशांची पोळे आता कुठे दिसत नाहीत. त्यामुळं आता बियाणे उत्पादक शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत. कारण मधमाशा फुलांकडे आकर्षित होऊन फुलांवर बसतात आणि त्यामुळं परागीकरण होऊन फुलांमध्ये चांगल्या उत्पादक क्षमतेच बीज तयार होतं. पण मधमाशा कमी झाल्यानं आणि परागीकरण कमी झाल्यानं जे बीज तयार होतं त्याची उगवण क्षमता कमी असते. तर काही वेळेला ते बीज उगवत नाही. त्यामुळं आता चांगल्या उगवण क्षमतेचं बीज तयार होत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत.  


शेतात किटकनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी


सध्या शेतकरी शेतात अनावश्यक किटकनाशकांची फवारणी करत आहेत. तसेच अनेक विषारी औषधांची फवारणी जसे तननाशके शेतातील पिकांवर करत असल्यानं मधमाशा मृत्यू पावतात. तसेच वातावरणातील प्रदूषणामुळं, सायनिक औषधांचा वासाने  मधमाशा फुलांकडे येत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनी अशा अनावश्यक किटकनाशक औषधंही फवारणी टाळावीत. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मधमाशांसाठी पोषक वातावरण तयार करावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मधमाशा शेतशिवरात वाढल्या तर परागीकरण मोठ्या प्रमाणात होऊन चांगल्या आणि उच्च प्रतीचे बिजोत्पादन होईल. यावर्षी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असली तरी मधमाशा दिसत नाहीत. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होताना दिसत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Jalgaon News : मधमाशी आधी चावली, मग घशात गेली... नंतर जे घडलं ते भयानकच होतं...