एक्स्प्लोर

'जनावरांमध्येही आता दो गज दूरी', लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Lumpy Skin Disease : राज्यात वेगाने पसरत असलेल्या जनावरांच्या लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) संदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

Lumpy Skin Disease : राज्यात वेगाने पसरत असलेल्या जनावरांच्या लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) संदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जनावरांमध्ये रोगाची वाढती संख्या पाहाता आणि पुढील धोका ओळखून शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाबाबत मोठी घोषणा केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासोबत, लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्कीन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी आज क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे. 

टास्क फोर्सची स्थापना - 
राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे.  लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे. 

लम्पी स्कीन बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार - राधाकृष्ण विखे पाटील
लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 
राज्यासाठी एका आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रूपये प्रमाणे मानधन सुरू करावे. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लंपी चर्म आजाराबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, असेही विखे पाटील यांनी सांगितलेय. 

जनावरांच्या दुधाचं प्रमाण घटतंय -
लम्पी आजारामुळं जनावरांचं दुधाचं प्रमाण घटत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सुरुवातीला बियाणांच्या वाढत्या किंमती, बोगस बियाणं, अतिवृष्टी यामुळं शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. तर आता शेतकऱ्यांचा जोडधंदा असणाऱ्या दुग्ध व्यवसावरही गंडांतर आलं आहे. कारण जनावरावरील लम्पी आजारामुळं शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकण्याची वेळ आली आहे. तर ही जनावरे खरेदीदारही खरेदी करण्यास तयार नाहीत. तर आजारी जनावरांचे दूधही आता बाजारात विकत घेतलं जात नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती, आंबा आणि काजू उत्पादकांना योग्य भावाचं आश्वासनही मिळालं होतं : सुनील तटकरे
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती, आंबा आणि काजू उत्पादकांना योग्य भावाचं आश्वासनही मिळालं होतं : सुनील तटकरे
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget