पाच ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे.

या विश्वचषकातील पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

ज्यामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्याचा समावेश आहे.

तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत.

या निमित्ताने क्रिकेट विश्‍वचषक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे

आज पुण्यात आणण्यात येणार आहे आणि या विश्‍वचषकाची मिरवणूक निघाली आहे.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि महाराष्ट्रातील आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित असणार आहेत.

यंदा पुण्यातील क्रिकेटप्रेमींना या ट्रॉफीसोबत फोटो काढता येणार आहे.

त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे.

क्रिकेटप्रेमींना ट्रॉफीसोबत फोटो काढता येणार