'तीळ गूळ घ्या गोड बोला' असं म्हणतं आपण संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या करतो.

तीळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तिळामध्ये तांबे आणि मॅंगनीज असते.

कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 1, बी 6 थायामिन फोलेट, नियासिन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि झिंक या सर्व गोष्टी देखील तिळामध्ये असतात.

तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात. तिळ खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास होत नाही.

तिळामुळे हाडे देखील मजबूत होतात तसेच कर्करोगाचा धोका देखील तीळ खाल्ल्याने कमी होतो.

तुम्हाला जर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार असतील तर तुम्ही रोज तीळ खाल्ले पाहिजेत.

पोट दुखत असेल किंवा फुगलं असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून मालिश केल्याने आराम मिळतो.

मूळव्याधाचा त्रास असेल तर हिंग वाटून लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.