तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मार्च 2016 मध्ये उर्मिलानं मोहसिन अख्तरसोबत लग्रनगाठ बांधली.



लग्नानंतर उर्मिलानं अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला.



नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनय क्षेत्रातील करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अशा सर्व विषयांवर उर्मिलानं चर्चा केली आहे.



'आई होण्याचा निर्णय जेव्हा मी घेईल तेव्हा मी सांगेन. मी अजून या विषयी जास्त विचार केला नाही. प्रत्येक महिलेनं आई व्हायलाच हवं अस काही नाही. मला लहान मुलं आवडतात.



पण जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना प्रेम देण्याची तसेच त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना जन्म द्यावा लागतो, असं नाहीये '



अभिनय क्षेत्रातामधून ब्रेक घेण्याबाबत उर्मिलाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिले,'मी अभिनय क्षेत्रात काम करणं सोडलं नाहिये.



पण आयुष्यात अनेक टप्पे येत असतात. मी त्या सर्व टप्प्यांना सामोर जात आहे. जेव्हा मी लग्न केले.



तेव्हा मला एन्जोय करायचे होते. मला आयुष्य साचेबद्ध पद्धतीनं जगायला आवडतं नाही.