शारदीय नवरात्रोत्सव आजपर्यंत आपण शा सर्वसामान्य लोक साजरा करत आलोय.

बिलोली तालुक्यातील जिगळा येथे तृतीयपंथीयांनी पुढाकार घेत गावात दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला

येथील ग्रामस्थांचीही धारणा बनली की तृतीयपंथीयांनी प्रतिष्ठापना केलेली दुर्गादेवी गावाला सुख- समृद्धी देते.

त्यामुळे गावकरीही यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात.

जिगळा गाव हे जवळपास दीड हजार लोकसंख्या असलेले गाव.तृतीयपंथीयांचीही गावात संख्या मोठी

समाजाने नाकारलेला घटक म्हणून त्यांच्याकडे नेहमी बघतले जाते.

मात्र जिगळा गावात तृतीयपंथीयांना ग्रामस्थ अगदी सन्मानाने वागणूक देतात.

कोणताही सण,उत्सव,सार्वजनिक कार्यक्रम असला तर त्यांना सन्मानाने सहभागी करून घेतात. कौटुंबिक वातावरण पाहायला मिळते.

तृतीयपंथीयांना कोणत्याही गोष्टीची अडचण आल्यास गावकरी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतात.

त्यामुळे तृतीयपंथीदेखील गावात सुख-समृद्धी नांदावी म्हणून देवाकडे मनोभावे प्रार्थना करतात