उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरु केलेल्या योजना बंद करण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: PTI

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रि‍पदी असताना एकनाथ शिंदे यांनी तीर्थदर्शन योजना काढली होती.

Image Source: PTI

ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

Image Source: facebook

त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा योजना देखील थांबवण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करीत आहे.

Image Source: facebook

तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं या योजना थांबवण्याचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

Image Source: facebook

तसेच शिवभोजन थाळी योजना देखील बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.

Image Source: ABP Majha

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आलं आहे.

Image Source: PTI

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले आहेत.

Image Source: PTI

उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहे.

Image Source: PTI