12 वी बोर्डाच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका विरारमधील एका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

ही घटना 10 मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोलींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली आहे.

Image Source: ABP Network

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या.

Image Source: ABP Network

मात्र, सोमवारी घरात अचानक आग लागली आणि या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला आहे.

Image Source: ABP Network

सदर घटनेने विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Image Source: ABP Network

बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे बंधनकारक असताना देखील त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी कशा नेल्या? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Image Source: ABP Network

शिक्षण मंडळाच्या नियमानुसार, परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षित पद्धतीने शाळेतच तपासण्याचे निर्देश असतात.

Image Source: ABP Network

त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या आणि त्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Image Source: ABP Network

उत्तरपत्रिका जळल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Image Source: ABP Network

त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Image Source: ABP Network