भारत देशात दररोज 13000 हून अधिक रेल्वे गाड्या चालवल्या जातात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

यात हमसाफर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, स्वर्ण जयंती एक्सप्रेस यांसारख्या अनेक रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

Image Source: pexels

भारतीय रेल्वे गाड्यांची नावे अत्यंत विचारपूर्वक ठरवतात.

Image Source: pexels

यात भारताची संस्कृती, इतिहास, भूगोल आणि देशातील अनेक वास्तूंचा समावेश असतो.

Image Source: pexels

हमसफर एक्सप्रेस

हमसफर एक्सप्रेस रेल्वे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी असते. हमसफर नावामध्ये प्रवाशांसोबतच्या सहप्रवासाचा सोबतीचा साथीदार असण्याचा भाव व्यक्त होतो.

Image Source: indiarailinfo

काशी-महाकाल एक्सप्रेस

काशी-महाकाल एक्सप्रेस उत्तर प्रदेशातील वाराणसी जंक्शन आणि मध्य प्रदेशातील इंदोर जंक्शनला जोडते. यामुळे भारतीय संस्कृतीचा वारसा जपला जातो.

Image Source: indiarailinfo

वंदे भारत

वंदे भारत एक्सप्रेस देशप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रगौरव दर्शविणारे आहे.

Image Source: indiarailinfo

राजधानी एक्सप्रेस

राजधानी एक्सप्रेस ही देशाची राजधानीला जोडणारी ट्रेन आहे.

Image Source: indiarailinfo

शताब्दी एक्सप्रेस

वेगवान रेल्वेसेवेच्या सुविधांसाठी शताब्दी एक्सप्रेस चालविली जाते.

Image Source: indiarailinfo

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels