उन्हाळा जीवघेणा कधी ठरतो? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

दिल्लीत सध्या कडक उन्हाचा पारा चढला आहे. या ठिकाणी काल तापमान 45 अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे.

Image Source: pexels

यासाठी आयएमडीने दिल्ली-एनसीआरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Image Source: pexels

यासाठीच उन्हाळ्याचा सर्वात जास्त त्रास आपल्याला कधी होतो आणि हा कसा जीवघेणा ठरतो ते जाणून घेऊयात.

Image Source: pexels

सहसा 45 अंश सेल्सियसच्या कोरड्या उन्हाळ्यापेक्षा 38 अंश सेल्सियसची दमट उष्णता अधिक धोकादायक असते.

Image Source: pexels

जर घाम शरीराला थंडावा देऊ शकत नाही, तर शरीरातील अंतर्गत अवयव निकामी होऊ लागतात.

Image Source: pexels

जर शरीराचे तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर जाते, तेव्हा शरीराची नैसर्गिक शीतकरण प्रणाली काम करणं बंद करते.

Image Source: pexels

अशा वेळी उन्हाळा जीवघेणा (हीट स्ट्रोक) ठरतो. ही स्थिती मेंदू आणि महत्वाच्या अवयवांना कायमचे नुकसान पोहोचवू शकते.

Image Source: pexels

उन्हाळ्याचा त्रास वृद्धांना तसेच लहान मुलांना सर्वात जास्त होतो.

Image Source: pexels

मात्र, याचा अर्थ असा नाही की तरुणांना उष्माघाताचा त्रास होत नाही. तर, हा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो.

Image Source: pexels

उन्हाळा आणि उष्णतेपासून बचाव हीच खरी सुरक्षा आहे. म्हणूनच घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या.

Image Source: pexels