तुम्हालाही जोडीदारापासून वेगळं होण्याची, गमावण्याची भीती वाटते?

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

सतत जोडीदाराची आठवण येणे

जोडीदार थोडा वेळ दूर गेला तरी अस्वस्थता जाणवते. मनात सतत त्याच्याबद्दल विचार सुरू असतो.

Image Source: PEXELS

एकटे राहणं भीतीदायक वाटणं

एकटं राहण्याची वेळ आली की मनावर भीतीचा अंधार पसरतो. ही भावना मनाच्या स्थैर्यावर परिणाम करू शकते.

Image Source: PEXELS

संवादात सतत असुरक्षितता

जोडीदाराने रिप्लाय न दिल्यास नकारात्मक विचारांचे लाट येतात. काही चुकलं का? असं वारंवार वाटतं.

Image Source: PEXELS

विनाकारण राग आणि चिडचिड

स्वतःचा तणाव अनावश्यक रागातून बाहेर येतो. नात्यात गरज नसताना तणाव निर्माण होतो.

Image Source: PEXELS

शरीरावर ताणाचे परिणाम

पोटदुखी, डोकेदुखी, थकवा ही मानसिक अस्वस्थतेची शारीरिक लक्षणं असू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य बिघडू शकतं.

Image Source: PEXELS

भावनिक गुंतवणूक अती होणं

संपूर्ण वेळ, भावना आणि उर्जा फक्त एकाच व्यक्तीवर खर्च होतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ मिळत नाही.

Image Source: PEXELS

सोशल मीडियावर सतत नजर ठेवणं

जोडीदार ऑनलाईन आहे का, कुणासोबत आहे, यावर लक्ष ठेवण्याची सवय निर्माण होते. हे विश्वास कमी करतं आणि मनाला थकवतं.

Image Source: PEXELS

नात्यात अवलंबित्व वाढणं

स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा जोडीदाराची गरज वाटते. ही सवय हळूहळू आत्मविश्वास कमी करते.

Image Source: PEXELS

आवडत्या गोष्टींमध्ये गुंतवून घ्या

नृत्य, वाचन, चित्रकला यासारख्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. यामुळे मन स्थिर राहतं आणि चिंता कमी होते.

Image Source: PEXELS

तज्ञांशी बोला, मदतीसाठी पुढे या

जर ही चिंता तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असेल, तर मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्या. नातं टिकवण्याइतकंच स्वतःचं मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे.

Image Source: PEXELS