आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे.



या हंगामात सात सामने खेळणाऱ्या मुंबईच्या संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही.



मुंबईचा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.



सध्या सोशल मीडियाद्वारे मुंबईचे चाहते रोहित शर्माला पाठिंबा देत आहेत.



मुंबईला दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.



आयपीएल 2022च्या गुणतालिकेत मुबईचा संघ तळाशी आहे.



मुंबईला आणखी सात सामने खेळायचे आहेत.



मुंबईचे पुढील सामने लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल यांच्याशी होणार आहेत.



आयपीएलच्या पंधराव्या हंगामातही रोहित शर्माला काही खास कामगिरी करता आली नाही.