अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने सहज पराभव केला.



आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 191 धावांत रोखले.



त्यानंतर रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर 192 धावांचे आव्हान भारतीने यशस्वी पूर्ण केलं.



भारताकडून रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली.



त्याशिवाय श्रेयस अय्यर यानेही संयमी अर्धशतक ठोकले.



तर भारताच्या गोलांदजांनी देखील पाकिस्तानच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.



भारताचे गोलंदाज देखील पाकिस्तानसमोर वरचढ ठरले.



जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली.



भारताच्या पाचही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या.



त्यामुळे पाकिस्तानला 42.5 षटकांत 191 धावांवर रोखलं.