अनेकजण नैसर्गिक रंगाचा वापर न करता रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळतात.
रासायनिक रंगांपासून खेळलेली रंगपंचमी अनेक आजारांना आमंत्रण देत असते.
रासायनिक रंगांमध्ये अनेक प्रकारची घातकी रसायने असतात.
रासायनिक रंगाचा वापर केल्याने दमा असलेल्या लोकांचं आरोग्य बिघडू शकते.
रासायनिक रंग श्वसनमार्गातून पोटात जाऊन संसर्ग वाढवू शकतात आणि यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो.
श्वासोच्छवासाचा त्रास, खोकला आणि ऑक्सिजनची पातळी कमी होणे अशी अनेक आजार होऊ शकतात.
त्वचेवर खाज सुटणे, लाल पुरळ उठणे, जळजळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
रासायनिक रंगाने त्वचेचा आजार वाढू शकतो.
रासायनिक रंगामुळे सोरायसिसची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.