भात खाणे अनेकांना आवडते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

राजमा, छोले, डाळसोबत भात खाणे बहुतेकांना आवडते.

Image Source: pexels

अनेकजण त्यांच्या आहारात पोळीऐवजी केवळ भाताचा समावेश करतात.

Image Source: pexels

जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.

Image Source: pexels

सुस्तपणा

तांदूळ शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो. भात खाल्ल्याने शरीर सुस्त होऊन आळस वाढतो. जेवणाच्या वेळेत पोटभर भात खाल्ल्यास जेवल्यानंतर काही क्षणातच झोप येऊ लागते.

Image Source: pexels

गॅसची समस्या

पांढऱ्या रंगाच्या तांदळात फायबरचे प्रमाण जास्त नसते. अशा स्थितीत ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसची समस्या होते. पांढऱ्या रंगाच्या तांदळाऐवजी तपकिरी (ब्राऊन) रंगाचा भात जास्त आरोग्यदायी आहे.

Image Source: iStock

वजन वाढते

शिजवलेल्या तांदळात कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे दररोज भात खाल्ल्याने वजन वाढते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भात मर्यादित प्रमाणात खावा.

Image Source: pexels

साखरेची पातळी

तांदूळमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका देखील वाढू शकतो.

Image Source: pexels

पोट फुगण्याची समस्या

भात लवकर पचते त्यामुळे भात खाल्ल्यानंतर लगेच झोपणे योग्य नाही. भात खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि पोट फुगण्याची समस्याही दिसू लागते.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels