डोळ्यांबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो.
आहाराच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे डोळ्यांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला वारंवार डॉक्टरांकडून देण्यात येतो.
डोळे संवेदनशील असल्याने डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तर अंधत्व येऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते डोळ्यांचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यामुळे लहानपणापासूनच डोळ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात लोकांमध्ये ग्लूकोमाची समस्या झपाट्याने वाढत आहे.
वाढत्या वयाबरोबर होणारी मोतीबिंदूची समस्याही डोळ्यांची दृष्टी हिरावून घेते. त्यामुळे डोळ्यांशी संबंधित काही लक्षणे दिसल्यास सावध राहणं गरजेचं आहे.
डोळ्यांच्या मज्जातंतूंच्या समस्यांमुळे अंधत्व येऊ शकते. वेळेवर उपचार केल्याने ही समस्या दूर केली जाऊ शकते.
डोळ्यांच्या अनेक आजारांमुळे वेदना वाढू शकतात. डोळ्यांना दुखापत झाल्यामुळे वेदना होऊ शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.