फळांमध्ये अनेक पोषकतत्व असतात. विविध सिझनची फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषकतत्व मिळत असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexel

अनेक आजारांपासून त्यामुळे आपली सुटका होते. फळांचा ज्युस पिल्याने आपल्याला त्यातील पोषक घटक मिळतात असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.

Image Source: Pexel

उलट फळांचा ज्युस पिण्यापेक्षा त्यांना खाणे अधिक योग्य असते. परंतू हल्लीच्या धावपळीच्या युगात कोणाला फळांना सोलून खाण्याची सवड नसते.

Image Source: Pexel

त्यामुळे फळांचा ज्युस पिण्याला अनेक जण प्राधान्य देत असतात. अनेकदा फळांचे ज्युस आपण नाश्ता करताना पित असतो.

Image Source: Pexel

परंतू सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी फळांचा रस पिण्याचे अनेक तोटे आपल्याला होऊ शकतात..

Image Source: Pexel

जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपले शरीर मेन्टेनन्स करीत असते. त्यावेळी आपल्या पोटात अनेक प्रकारचे केमिकल्स निघत असतात.

Image Source: Pexel

पचनासाठी एसिड निघत असते. पचनप्रक्रीये दरम्यान बायप्रोडक्टच्या रुपात एसिड जमा होत असते. हे गरजचे असते.

Image Source: Pexel

किडनी स्टोनचा धोका

हिरव्या भाज्या पालक किंवा ब्रोकलीत ऑक्जेलिक एसिड असते आणि फळांत साइट्रीक एसिड असते.

Image Source: Pexel

गॅस्ट्रीक आणि डायबिटीज

ज्यांना मधूमेहाचा त्रास आणि किंवा गॅसेसचा त्रास आहे त्यांनी सकाळचा रस पिण्याच्या फंद्यात पडू नये.

Image Source: Pexel

मग ज्यूस केव्हा प्यावा?

दिवसाचे लंच आणि रात्रीच्या डीनरच्या अगोदर काही तास आधी ज्यूस पिण्यासाठी योग्य वेळ आहे.

Image Source: Pexel

म्हणजेच सकाळच्या नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने तु्म्ही ज्यूस प्यायला तरी चालेल. कारण त्यावेळी शरीरात असिडचे प्रमाण इतके नसते.

Image Source: Pexel

टीप : वरील माहिती ही न्युट्रीशियन डॉ. प्रियंका रोहतगी यांनी दिलेली आहे.

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pexel