संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काहीच तास उरले आहेत.

तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुच आहे.

इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहतंय, जे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका ठरत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा याला कारणीभूत ठरत आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीतील अनेक कंपन्या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडतात.

परिणामी नदीची अशी दयनीय अवस्था होते.

एबीपी माझाने जानेवारी महिन्यात हा प्रकार समोर आणला, तेव्हा सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने कारवाईचा हा फार्स होता हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

त्यामुळे पालखी प्रस्थानाची वेळ आली असतानाच इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी पाहायला मिळत आहे.