सातारा आणि रत्नागिरीला जोडणारा खेड तालुक्यापासून 25 किलोमीटरवर असलेला सह्याद्री कुशीतील नागमोडी वळणाचा रघुवीर घाट.

पावसाळ्यात काळ्या कपारीवर उगवलेल्या हिरव्यागार गवताच्या शालूने आणि त्यात फेसळणारे धबधब्यांनी पर्यटकांनी भुरळ घातली आहे.

नागमोडी वळणातून प्रवास करतांना शेकडो प्रवाहित झालेले धबधबे आपल्याला पाहायला मिळतील.

याच नागमोडी वळणातून प्रवास करत पुढे-पुढे जात असताना दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली आपल्याला दिसते.

सह्याद्रीच्या पर्वत रांगातून फेसळणारे असंख्य धबधबे खळखळत वाहत वाहत शिंदी गावातील नदीला मिळतात.

एका बाजूला शिरगाव-खोपीच डूबी धरण तर दुसऱ्या बाजूला उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा यातून उडणारे तुषार जणू काही गगनाला गवसणी घालतात.

कातळावर उगवलेल्या हिरव्या गार गवताबरोबरच याच कातळावर रंगी बेरंगी खेकडे इथे पाहायला मिळतात.

या रघुवीर घाटाची सफर म्हणजे एक अविस्मरणीय वर्षा सहल. या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरील शेकडो पर्यटक मौज मजा करण्यासाठी इथे येतात.

निसर्गाने कोकणाला भरभरुन दिले आहे. त्यात पावसाळ्यात कोकणातील निसर्ग सौदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते.

Thanks for Reading. UP NEXT

कोकणात समुद्राला उधाण, किनारी उंचच उंच लाटा

View next story