मधुमेहींनी आपल्या आहारात सकस आणि नैसर्गिक अन्नाचा समावेश करावा, जेणेकरून या आजारातही ते नेहमी निरोगी राहू शकतील.



दालचिनी इंसुलिनची क्रिया सुरू करते आणि ती सुधारण्यास मदत करते.



कडुलिंबात ग्लायकोसाईड्स आणि ट्रायटरपेनॉइड्स असतात, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतात.



हळदीमध्ये कर्क्युमिन अँटीऑक्सिडेंट असतात, जे मधुमेहावर फायदेशीर आहेत.



कारले खायला कडू वाटत असले, तरी त्यात असलेले केराटिन आणि मोमोर्डिसिन हे मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करतात.



इंसुलिन स्राव नियंत्रित करण्यासाठी आले खूप प्रभावी मानले जाते.



टोमॅटो हा ‘व्हिटॅमिन सी’चा समृद्ध स्रोत आहे, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतो.



जांभळाच्या बियांमध्ये ‘जांबुलीन’ नावाचा घटक असतो, जो रक्तातील साखर नियंत्रित करतो.