देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे, मात्र कोरोनाबळींची संख्या चिंताजनक आहे



देशात गेल्या 24 तासात 50 हजार 407 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



हा आकडा आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे



काल देशात 58 हजार 77 नवे कोरोना रुग्ण आढळले होते तर, 657 जणांचा मृत्यू झाला होता



गेल्या 24 तासात भारतात एक लाख 36 हजार 962 रुग्ण बरे झाले आहेत



सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 इतकी झाली आहे



दैनंदिन रुग्ण सकारात्मक दर 3.48 वर पोहोचला आहे



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 वर आली आहे



कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाच लाख सात हजार 981 इतकी झाली आहे



आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 36 हजार 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत