जगभरात करोडो चहा प्रेमी आहेत. चहा हे असे पेय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही



ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत.



अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात.



केक, चॉकलेट, बिस्किटे यांसारख्या गोड पदार्थही चहासोबत टाळावेत.



चहासोबत गोड पदार्थ खाल्ल्यानं एनर्जी लेवल कमी होते. त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.



तळलेले पदार्थ पचायला जड असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला सुस्तपणा जाणवू शकतो.त्यामुळे कांदा भजी, पुऱ्या यांसारख्ये तळलेल्या पदार्थांचे सेवन चहासोबत करणे टाळा.



चहासोबत मसालेदार पादर्थ खाणं टाळावं. लसूण, कांदा, कढीपत्ता आणि मिरची यांचा वापर करुन तयार करण्यात आलेले पदार्थ चहासोबत खाणे टाळा.



आम्लयुक्त खाद्यपदार्थ म्हणजेच अॅसिडिट फूड चहासोबत खाऊ नयेत. कारण ते खाल्ल्याने शरीराला चहामध्ये आढळणारे कॅटेचिन (अँटीऑक्सिडंट्स) शोषून घेणे कठीण होते.



चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.



रोज दोन कप चहा प्यावा. त्यापेक्षा जास्त चहा प्यायल्यानं अॅसिडीटीचा त्रास जाणवू शकतो.