अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो.



अक्षयचे काही चित्रपट सुपरहिट ठरले तर काही चित्रपटांना मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.



काही दिवसांपूर्वी अक्षयचा 'सेल्फी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत नाहीये.



2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या 'सुर्यवंशी' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर रिलीज झालेला त्याचा रामसेतू हा चित्रपट फ्लॉप ठरला.



अक्षयचे 'लक्ष्मी', 'बच्चन पांडे' यांसारख्ये चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले.



आता चित्रपटांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अक्षयने प्रतिक्रिया दिली आहे.



एका मुलाखतीमध्ये अक्षयने सांगितलं, हे माझ्यासोबत पहिल्यांदा घडतंय असं नाही. माझ्या करिअरमधील जवळपास 16 चित्रपट फ्लॉप ठरले. असा काळ देखील होता, जेव्हा माझे आठ चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे'



'प्रेक्षक किंवा इतर कोणालाही दोष देऊ नका. 100 टक्के ही माझी चूक आहे. तुमचा चित्रपट फ्लॉप ठरतो तर तो प्रेक्षकांमुळे नाही. तुम्ही चुकीचा चित्रपट निवडल्याने तो फ्लॉप ठरतो.' असंही अक्षयनं सांगितलं.



2022 मध्ये रिलीज झालेले 'बेल बॉटम' आणि 'सम्राट पृथ्वीराज' हे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले.



अक्षयचा 'हेरा फेरीः 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.