आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.



आमिर आज आलिशान आयुष्य जगत असला तरी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.



आमिरने नुकतचं एका मुलाखतीत त्याला आयुष्यात कराव्या लागणाऱ्या संघर्षावर भाष्य केलं आहे.



आमिरचे वडील ताहीर हुसैन हे सिने-निर्माते होते. त्यामुळे आमिर लहानपणापासूनच आलिशान आयुष्य जगत आला असल्याचा अनेकांचा समज आहे.



नुकत्याच एका मुलाखतीत बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आमिर म्हणाला,माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी आम्हाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला होता.'



'एका सिनेमाच्या निर्मितीसाठी वडिलांनी बॅंकेतून कर्ज घेतलं होतं. पण त्यानंतरही त्यांना त्या सिनेमाची निर्मिती करता आली नाही. तसेच ते कर्ज फेडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.' असंही आमिरनं सांगितलं.



आमिर खानने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.



नुकताच त्याचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाची निर्मात्यांकडून खूप अपेक्षा होती.



आमिरचा आता पुढचा प्रोजेक्ट नक्की काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही.



आमिर हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.