उत्तर प्रदेश : रायबरेलीच्या औष्णिक वीज प्रकल्पात स्फोट, 26 मृत्यूमुखी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2017 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उत्तर प्रदेशातील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला आहे. यात 26 कामगारांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. रायबरेली हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. त्यामुळे राहुल गांधींनी गुजरातचा दौरा अर्थवट सोडून रायबरेलीकडे धाव घेतली आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.