उस्मानाबाद : निधी नसल्याने जलयुक्त शिवाराची कामं थांबवली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या थाटात जलयुक्त शिवार योजनेची घोषणा केली. पण सध्या कुठे नेऊन ठेवला जलयुक्त शिवार योजनेचा निधी? असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी टंचाईचा फटका बसला आहे. राज्याच्या घसरत्या आर्थिक परिस्थितीमुळे लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत असलेली कामं थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 31 जानेवारीला विभागाच्या सचिवांना राज्यातल्या जलयुक्त शिवार कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्यात कामं सुरु झाली नाहीत, असे सर्व कामं थांबवण्याचे आदेश दिले आहेत.