
Shahjibapu Patil : संजय राऊत कुजक्या बुद्धीचे, एकनाथ शिंदे जेम्स बॉण्ड; शहाजीबापूंची स्फोटक मुलाखत
Shahaji Bapu Patil Exclusive : शिवसेनेच्या (Shivsena) चुकीच्या धोरणामुळे आणि चांडाळ चौकडील वैतागून दोन दिवसात 50 आमदार (Shiv Sena Rebel MLA) उठावासाठी एकत्र आले हा जागतिक घटना आहे. आमच्यातील कोणीही गद्दार नसून आईच्या कुशीतूनच आम्ही खुद्दार मराठमोळी माणसे आहोत, असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळ असलेली चांडाळ चौकडी एका बाजूला आणि संपूर्ण महाराष्ट्र एका बाजूला असे चित्र असताना ठाकरे यांनी या कुजक्या चौकडीला दूर ठेऊन शांतपणे विचार केल्यास त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे मत समजून येईल, असा सल्ला शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे. काही बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच सत्ता बदल होईल अशा वावड्या उठवणाऱ्या संजय राऊत यांनी हे लक्षात ठेवावे कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 50 आमदारांच्या पैकी एकही आमदार आयुष्यात कधीही पुन्हा त्यांच्या हाताला लागणार नाही असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी लगावला. मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते पण आमच्या आग्रहामुळं त्यांनी हे पाऊल उचललं असंही शहाजी बापूंनी सांगितलं.