Pune Ganesh Visarjan Special Report : 29 तासांच्या विसर्जन मिरवणुका, पुण्यातील रस्ते दोन दिवस ठप्प
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे: गेले दहा दिवस महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटात पार पडला. पण गेल्या काही काळात या उत्सवाच बदलत गेलेल स्वरूप आणि विसर्जन (Pune Ganpati Visarjan) मिरवणुकांमधील कर्णकर्कश गोंगाट पाहता हे सगळं धर्मशास्त्रात बसतं का हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर तासंतास चालणाऱ्या मिरवणुकांमुळे शहरात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळतेय. या दिवसात अनेकांना वाहतूक कोंडी आणि आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
गणेशोत्सवातील (Pune Ganpati Visarjan) दहा दिवसांमध्ये असलेले मांगल्याचे, सात्विकतेचे वातावरण विसर्जनाच्या (Pune Ganpati Visarjan) शेवटच्या दिवशी मात्र पुर्ण बदलून जातं. गणेशोत्सव म्हणजे पवित्र व्रतं पार पाडणं. ईश्वराच्या सगुण साकार स्वरुपाकडून निर्गुण निराकार साधनेकडे प्रवास करणं असं धर्मशास्त्र सांगतं. मात्र आज गणेशोत्सवाला आलेल्या स्वरूपामुळे हा मुळ उद्देश मागे पडल्याच धर्म अभ्यासक म्हणतायत. गणेशोत्सवातील हे बदललेलं वातावरण कळस गाठतं ते विसर्जन मिरवणुकीत पुण्या-मुंबईत ही विसर्जन मिरवणूक तासंतास चालते. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यासह प्रमुख रस्ते दोन दिवस बंद राहतात ज्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीत लोकसहभाग वाढावा यासाठी घरातील गणपती रस्त्यावर आणून त्याचा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक कलाकारांना या उत्सवाने व्यासपीठ मिळवून दिलं. आधी लोकवर्गणीतून साजरा होणारा हा उत्सव लोकांनां आपला वाटायचा. पण हळूहळू याला इव्हेंटचे स्वरुप येत गेल्यानं धर्मशास्त्रात न सांगितलेल्या गोष्टींचा शिरकाव उत्सवात झाला.