परमबीर सिहांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या भाजपला आज त्यांचाच पुळका का येतोय? सचिन सावंतांचा सवाल

फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना तो अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची दिशाभूल केली आणि काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola