Devendra Fadanvis Uncut: निवडणुका हरलो तरी चालेल, पण....
'आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आहे पण त्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आहे आणि यात जनतेचे मात्र हाल होत आहेत', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माविआ सरकारवर निशाणा साधला