Mumbai School Reopen : मुंबईतल्या 8वी ते 12 वीच्या शाळा 4ऑक्टोबरपासून सुरु होणार: Iqbal singh chahal

Continues below advertisement

मुंबई : तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा आता 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील महानगरपालिका शाळा, खाजगी व्यवस्थापन, इतर सर्व मंडळाच्या शाळांना आठवी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आयुक्तांपुढे मांडण्यात आला होता. त्याला बीएमसी आयुक्त इकबाल सिंग चहल यांची  मंजुरी मिळाली आहे. मुंबई परिक्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा 2553 आहेत व त्यात एकूण विद्यार्थी 5, 13, 502 विद्यार्थी शिक्षण घेतात.

शिक्षण विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचा पालन करत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्याआधी शाळांनी योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे असे निर्देश पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. याशिवाय शाळा सुरु करण्याआधी व केल्यानंतर आरोग्य , स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनांना करण्यात आल्या आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडिअम हायपोक्लोराइड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी आपल्या स्तरावर निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना पालिका शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ज्या शाळा आतापर्यंत कोविड 19 चे केंद्र , विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र म्हणून वापरात आहेत, त्यांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करून शाळा वारण्यायोग्य स्थितीत आणाव्यात अशा सूचना ही शहरातील शाळा व्यवस्थापन आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram