Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 22 ऑगस्ट 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 22 ऑगस्ट 2024: ABP Majha
बदलापूरच्या (Badlapur School Abuse Case) घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) कडाडून टीका केली आहे. तसेच शनिवारचा म्हणजे 24 महाराष्ट्र बंद राजकीय नाही असं स्पष्टीकरण देखील उद्धव ठाकरेंनी दिले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या 24 ऑगस्टला बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल मुली शाळेत जाताय. पण त्या सुरक्षित नसतील तर मग महाराष्ट्र कुठे पुढे जातोय? फक्त कालची घटना नाही तर अश्या अनेक वृत्त पत्रातील बातम्या सुद्धा मी आणल्या आहेत. बंगालमध्ये जे कृत्य घडलं त्यात देशभरात आगडोंब उसळला. दिल्लीत निर्भया प्रकरण झालं तेव्हा सुद्धा असाच झालं होतं. बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही.. कठोर शिक्षा यामध्ये व्हावी सुरक्षित बहीण ही प्राथमिकता आहे... बहीण सुरक्षित असेल तर ती लाडकी होऊ शकते. म्हणून महाराष्ट्रतल्या जनतेला आवाहन करतो 24 ऑगस्टला बंदमध्ये साथ द्या... उठो द्रौपदी शस्त्र उठाओ म्हणतो... पण ही कडेवारची मुलगी कुठे शस्त्र उठाओ.. जनतेचा आक्रोश आहे... त्यासाठी हा बंद आहे ..स्वतः हून हा बंद पाळला पाहिजे.. बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच : उद्धव ठाकरे राज्यात सध्या विकृतीचा व्हायरस पसरला आहे. ठाणे जिल्हा हे मुख्यमंत्री यांचे घरं आहे. हे दुष्कृत्य ते मान्य करताय का? पोलिस ढिम्म आहेत म्हणून जनता पेटून उठली. नाहीतर काय करणार.. मुख्यमंत्री कुठे होते? ते रत्नागिरीमध्ये राख्या बांधत होते... राख्याला तरी जागा ...मुख्यमंत्री यांना बदलापूरला जायचं होतं तर हे रत्नगिरीमध्ये होते जाऊन बसले त्यात गुलाबी जॅकेट सुद्धा होतं , असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.