औरंगाबाद विभागीय मंडळाचा अजब आदेश; राज्यातील दहावी, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2020 01:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सर्वत्र कोरोना मुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभागाला याचे भान राहिले नसल्याचे चित्र आहे. कारण या विभागीय मंडळाने अजब आदेश काढले आहेत. दहावी आणि बारावीच्या तपासणी झालेल्या उत्तरपत्रिका औरंगाबादला आणून जमा करण्याचे आदेश या मंडळाने दिले आहेत. या आदेशाला उत्तरपत्रिका तपासणी करणाऱ्या नियामकांनी तीव्र विरोध केला असून आम्ही कुठल्याही परिस्थितीत या उत्तरपत्रिका घेऊन औरंगाबादला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या सगळ्या घटनांचे परिणाम निकालावर उमटण्याची चिन्ह आहेत.