Raju Shetti : ...तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2021 03:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetti On Maharashtra Govt : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी एफआरपीच्या तुकड्यावरून आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक झाले आहेत. जर राज्यकर्त्यांनी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी गोड नाही केली तर तुमची दिवाळी कडवट करू, असा इशारा त्यांनी राज्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर 19 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.