Nalasopara Crime : 25 महिलांशी लग्न करणाऱ्या लाखोबा लोखंडेला बेड्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNalasopara Crime : 25 महिलांशी लग्न करणाऱ्या लाखोबा लोखंडेला बेड्या
हेही वाचा :
देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना सांगून आपल्यासमोरील अडचणींमध्ये काही मदत होते का अशी विनंती त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली होती असा आरोप समित कदम यांनी केला. मी स्वतःहून अनिल देशमुख (Devendra Fadnavis) यांना भेटायला गेलो नव्हतो तर देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं होतं, त्यामध्ये फडणवीसांचा संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. समित कदम हे मिरजेतील जनसुराज्य शक्ती युवा अध्यक्ष असून त्यांच्या नावाचा उल्लेख अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना केला होता. त्यावर समित कदम यांनी स्पष्टीकरण दिलं.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करा, मग आम्ही तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून मुक्त करू असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव आणला होता असा आरोप तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी मित्रपक्षाचे पदाधिकारी असलेल्या समित कदम यांना पाठवल्याचंही देशमुखांनी सांगितलं होतं.