Maharashtra Temperature: होळीनंतर राज्यातील पारा वाढणार! ABP Majha


राज्यातील तापमानात होळीनंतर मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या अनेक भागात पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेलाय. तर विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा लाटेचा इशारा दिलाय. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. विदर्भातल्या अनेक शहरांचा पारा ४० अंशांपार गेला होता. इकडे कोकणात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट असली तरी कोकणातलं तापमान स्थिर आहे.. या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आहे. मुंबईतली मात्र उष्णतेची लाट ओसरली असं हवामानखात्यानं सांगितलंय. या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola