Maharashtra Rain Superfast : दक्षिण मुंबईत पावसाच्या सरी,पालघर जिल्ह्याला तीन दिवस येलो अलर्ट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर जिल्ह्यात पावसाने सलग चार दिवस दमदार हजेरी लावली आज पाचव्या दिवशीही पावसाची रिमझिम सुरूच असून काल डहाणू शहरामध्ये सर्वाधिक 315 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तलासरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलं. तर तलासरी तालुक्यातील कोमगाव येथून वाहणाऱ्या गावघात नदीला पूर आल्यामुळे या पुरात एक महिला वाहून गेल्याची घटना घडलीय.. सूर्या आणि वैतरणा नद्यांनाही मोठा पूर आलाय..तर दुसरीकडे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 58% भरलं असून जिल्ह्यातील इतर लहान धरण ही 100% भरण्याच्या मार्गावर आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे आपली वाटचाल केली आहे... सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 38 फूट 10 इंच इतकी पोहोचली आहे... जिल्ह्यातील 84 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत... त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे...
कल्याण स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झालीये.. कल्याण जवळ लोकल थांबवण्यात आल्या आहेत... त्याचप्रमाणे मुंबई आणि कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत..