Maharashtra Corona Crisis | गोव्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी ई-पास सक्तीचा
गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना ई-पास सक्तीचा केला आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्यावर थांबवण्यात येत आहे. गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक प्रवासी ऑनलाईन ई-पास काढण्यासाठी धावपळ करत आहेत. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी शासनाने ई-पास सक्तीचा केला आहे. सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर याची कडक अंमलबजावणी सुरु आहे. ई-पास नसलेल्या वाहनधारकांना सीमेवर थांबवण्यात येत आहे. पास असलेल्या वाहनचालकाना प्रवेश देण्यात येत आहे. यामधून अत्यावश्यक सेवेची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे इतर रस्ते देखील बंद करण्यात आले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Tags :
Maharashtra Maharashtra Corona Goa Maharashtra Police E-pass Maharashtra Corona Crisis E-pass