Corona Vaccine Drive | राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा : राजेश टोपे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2021 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे लसीच्या वापरावरुन केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राला धारेवर धरलेलं असताना दुसरीकडे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मात्र महाराष्ट्राकडे पुढील 10 दिवस पुरेल इतकाच साठा आहे. अशी माहिती राजेश टोपेंनी दिलीय. तर, 20 लाख डोस दर आठवड्याला केंद्राने द्यावे. अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केंद्राकडे केलीय. तर महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झालाय असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलाय. म्हणजेच महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. असा जावडेकरांनी दावा केलाय.